Thursday, 26 May 2016

निरुपणातील मुद्दयांचा क्रम आणि आराखडा


1. देव आपल्या भक्तांची संकटे स्वत: सोसत असतो.

2. भक्त म्हणजे कोण? आपल्या देहाविषयी जे उदास म्हणजे निरपेक्ष आहेत, ज्यांचे सर्व आशापाश तुटलेले आहेत , ज्यांना  जन, धन, माता, पिता या ऐहिक गोष्टींची आवड उरलेली नाही. कारण केवळ 'नारायण' हाच त्यांचा विषय झाला आहे. तेच खरे भक्त होत.

3. देव संसाराविषयी उदासीन असलेल्या भक्ताच्याच मागे धावतो.

4. अभक्त म्हणजे कोण? कमळ आणि बेडूक एकाच ठिकाणी म्हणजे नदीच्या चिखलात असतात. पण बेडूक कधीही मकरंदाचे सेवन करीत नाही. भुंगा मात्र अत्यंत दूरवरून येतो आणि मकरंदाचे सेवन करून जातो.

5. दृष्टान्तः एकाला चिखल मिळतो आणि एकाला मध मिळतो.

6. सर्व सुखाचे मूळ असलेला भगवंत सर्व प्राणिमात्रांच्या हृदयात आहे, पण श्रध्दा नसलेल्यांना त्याची प्राप्ती होऊ शकत नाही.

7. निर्वाणीचे संकट कोसळल्यास देव भक्ताला पोटाशी धरून ठेवतो. एका प्रकारे देव त्याचा अंकित होऊन जातो.

8. अनन्यभावाने शरण आलेल्या भक्तांची सेवा प्रत्यक्ष परमात्मा करतो व त्यांची सतत काळजी वाहतो.

9. ज्या ठिकाणी वैष्णव कीर्तन करतात तेथे हा श्रीपती उभा राहतो.
10. या देवाला कीर्तनाची इतकी गोडी आहे की तो चक्क उडया मारत कीर्तनात येऊन उभा राहतो.

11.एक क्षणसुध्दा वाया न दवडता  नामस्मरण केले पाहिजे. तर मग वेळ न लावता भगवंत धावून येतो.

12. भगवंतांच्या नामामुळे अवघ्या जगातील दुःखे नाहीशी झाली. सगळीकडे सुखच सुख निर्माण झाले.

13. फक्त नामसंकीर्तन करा. तो भगवंत तुमच्या घरी पत्ता विचारत येतो.

14. हा पांडुरंग सर्व ठिकाणी व्यापून राहिलेला आहे व सर्वत्र भरून उरला आहे.

15. जनाबाई म्हणतात - देवाशिवाय काहीच रिकामी जागा शिल्लक नाही.

16. दृष्टान्त - गणपती असो की उंदीर असो. शेवटी सोने ते सोनेच त्यामुळे दोघांचाही भाव एकच.


17. सर्वत्र देव भरून राहिलेला आहे असा अनुभव भक्ताला आला म्हणजे त्याला आत्मज्ञान झाले.

No comments:

Post a Comment