तुमचा संसार दुःखी का आहे?
ह. भ. प. दीपक महाराज जेवणे
आता एक
महत्त्वाची गोष्ट सांगतो. लक्ष देऊन
ऐका.
ज्या पुरुषमंडळींनी आपल्या
घरच्या मंडळीला कीर्तनाला आणलं
आहे त्या घरच्या मंडळींनी
आणि ज्या घरच्या मंडळींनी
आपल्या नवर्याला कीर्तनाला
आणलं असेल त्या सर्व
नवरे मंडळींनी लक्ष
देऊन ऐका.
मागच्या वेळी
एकजण म्हणाले - महाराज, नवर्याने बायकोला
आणलं आहे की बायकोने
नवर्याला आणलं आहे
ते कसं ओळखायचं?
अगदी सोपं
आहे.
ज्या नवर्याला वाटते
की आपल्या बायकोत काहीतरी
चांगला बदल व्हावा... समजायचं की
तो आपल्या बायकोला कीर्तनाला
घेऊन आला आहे आणि
ज्या बायकोला वाटते की
आपल्या नवर्यात चांगला
बदल व्हावा... समजायचं की
ती बायको आपल्या नवर्याला
कीर्तनाला घेऊन आली आहे...
विट्ठल... विट्ठल... विट्ठल...
मग त्यानं
पुन्हा विचारलं - समजा, जे एकेकटे
आले आहेत त्यांचं काय?
समजा, नवरा एकटा
आला असेल तर समजायचं...
घरच्या मंडळीत आता बदल
घडून येण्यासाठी अजिबात
वाव नाही असं त्याला
वाटतं आणि बायको एकटी
आली असेल तर समजायचं
नवर्यात काही बदल
घडून येण्यासाठी अजिबात
वाव नाही असं तिला
वाटतं...
विट्ठल... विट्ठल... विट्ठल...
खरं सांगू? एकट्यान
कीर्तनाला येऊ नये. जोड्यानं याव... म्हणजे
जोडे घालून नव्हे! कीर्तनात जोडेच
चोरीला जातात राव...
विट्ठल... विट्ठल... विट्ठल...
नवर्यांनी कायं
करावं?
बायको घरी
भांडी घासत असेल तर
आपण म्हणावं... तू झटपट
तयार हो... मी घासतो
भांडी... आणि तिला कीर्तनाला
आणावं. तीसुद्धा म्हणेल गडी
सुधारला...
बायकांनी काय
करावं?
नवरा जर
झाडू मारतं असेल तर
म्हणावं... एक दिवस मी
मारते झाडू... झटपट तयार
व्हा.... दोघं कीर्तनाला जाऊ...
गड्यालाही वाटेल...
बायको सुधारली बुवा...
विट्ठल... विट्ठल... विट्ठल...
तर असं
नवराबायको दोघांनीही कीर्तनाला
यावं आणि सगळ्यात महत्त्वाची
गोष्ट.. ज्याला असं वाटते
की आपल्यात काहीतरी चांगला
बदल घडून यावा... समजायचं की
तो स्वतः कीर्तनाला आला
आहे...
महाराज, खरं सांगतो... कधीही आपण
दुसर्यात बदल घडवू
शकत नाही... बदल घडवायचा
असेल तर तो आपल्यात
घडवावा लागतो...
विट्ठल... विट्ठल... विट्ठल...
तुम्हाला तरी
वानर आणि मगराची गोष्ट
माहीत आहे. अरे माझं
काळीज तर झाडावर ठेवलं
आहे असं सांगून माकड
आपला जीव वाचवतं... पण पुढची
गोष्ट कुणाला माहीत आहे
का?
नवर्यानं माकडाचं काळीज
आणलं नाही, म्हणून ती
मगरीण अशी रुसली की
तिनं अन्नपाणीच बंद
केलं... मगरानं अगदी हात
टेकले पण ऐकेल तर
ती बायको कसली? शेवटी तिचा
जीव गेला महाराज... मग तो
मगर शोक करू लागला...
हो,
बायको मेल्यावर नवरा
शोक करतो... शेवटी प्रेम
असतं...
विट्ठल... विट्ठल... विट्ठल...
तर तो
मगर काय म्हणतो? नीट ऐका...
न गृहं गृहमित्याहुर्गृहिणी गृहमुच्यते ।
गृहं तु गृहिणीहीनं कान्तारादतिरिच्यते ॥
काय सांगाल? हिंदू
धर्मात महिलांना काहीच
किंमत देत नाहीत आणि
हिंदू धर्मात महिलांवर नुसता
अत्याचार होतो...
नुसतं घर
म्हणजे घर नव्हे! गृहिणी म्हणजे
घर आणि घर म्हणजे
गृहिणी होय. गृहिणीशिवाय घर
म्हणजे अरण्यापेक्षा भयंकर
होय...
बायकोला काय
म्हणतात... कांता
अरण्याला काय
म्हणतात... कांतार
केवळ एका ‘र’चा
फरक...
बायको धमकी
देते... माहेरी जाईन!
नवरा म्हणतो...
जा की एकदाची...
पण चार
दिवस झाले नाही की
मग त्याला घर खायला
धावत... घराचं अरण्यात रूपांतर
होते..
विट्ठल... विट्ठल... विट्ठल...
घराचं घरात
रूपांतर करते ती गृहिणी...
पण प्रश्न
असा आहे की, गृहिणी कुणाला
म्हणावे...
घराची टापटीप, मुलाबाळांचे
संगोपन, पाहुण्यांचे आदरातिथ्य, वडील मंडळींची
सेवा आणि नवर्याची प्रसन्नता
या सर्व गोष्टी सांभाळणे
जिला साधते ती गृहिणी
होय...
त्यामुळे हिंदू
धर्मात असं सांगितलं आहे...
भविष्यपुराणात व्यासमुनी
सांगतात-
जाया त्वर्ध शरीरस्य नृणां धर्मादिसाधने ।
नातस्तातु व्यथां काञ्चित् प्रतिकूलं समाचरेत् ॥
जर धर्म, अर्थ, काम
या पुरुषार्थांची प्राप्ती
करायची असेल तर नवर्याला
त्याच्या बायकोची सोबत लागते...
कारण पत्नी ही पुरुषाचा
अर्धा भाग असते. त्यामुळे तिला
पीडा होईल असे करू
नये...
तिच्या मनाविरुद्ध वागू
नये...
माझं सर्व
नवरे मंडळींना सांगणं
आहे...
हा गृहस्थाश्रम आहे... गृहस्थ
आपल्या अर्धांगीचं मन
आणि मान राखून वागला
तर त्याला आणि त्याच्या
सर्व परिवाराला सुख
मिळू शकते...
आज बर्याच
लोकांच संसार दुःखी का
आहेत? याचं उत्तर याच
गोष्टीत लपलं आहे.
विट्ठल... विट्ठल... विट्ठल...
No comments:
Post a Comment